घाव अजुनी...

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

मानसिक कमकुवतपणा

अग्नीसमाधी, जलसमाधी हे प्रकार आत्महत्येचेच आहेत. जीवनात भरलेले नैराश्य आणि त्याला सामोरे जाण्याची हळूहळू संपुष्टात येत चाललेली क्षमता आणि त्याबरोबरच कधीही कुणी न पाहीलेले परंतु आपल्या गुढपणामूळे कायम आकर्षण निर्माण करणारे मृत्युनंतरचे काल्पनिक जग या सगळ्या बाबी याला कारणीभूत आहेत. आध्यात्मिक कहाण्यांच्या आत्यंतिक आहारी जाण्यामूळे मोक्ष, स्वर्गप्राप्ती यांचा पगडा डोक्यावर बसून असली कृत्ये हातून घडून जातात. तत्कालिन झिंगलेपणातून असे काही करण्याची हिंमत निर्माण होते. मग ती झिंग रागाची असो की भक्तीची तो एक आत्मघाती अपघातच असतो. सामान्य जीवन जगणारी, रोजच्या हजार दुःखांना सामोरे जाऊन प्रसंगी त्यांना नतमस्तक करणारी माणसे या लोकांपेक्षा खरे तर श्रेष्ठ म्हणायला हवीत.