नळाला येणारे पाणी, तळ्यातून येणारे पाणी यातील रचना त्यातील प्रचंड दबावामूळे बदलते (म्हणजे H2O चे 2OH किंवा O2H )आणि मग हे पाणी शरीरात शोषण्यालायक फारच कमी प्रमाणात राहते. म्हणजे योग्यप्रकारे रचना असलेले पाणी शरीरात शंभर टक्के शोषले जात असेल तर असे कल्चर्ड किंवा संस्कारीत पाणी १०० टक्के शोषले जाते. अशा संस्कारीत पाण्याच्या नेहमी प्राशनामुळे बहिरेपणा, गुढगेदूखी, मानसिक ताणतणाव आदी प्रश्न चुटकीसरशी सुटतात.
हे संस्कारीत पाणी मिळवायचे कुठून? सोपे आहे. पंधरा हजाराच्या आसपास एक काचेची डिस्क (साधीसुधी नाही तर नासा आपल्या अंतराळात जो काच वापरते त्या काचेपासून बनलेली ) विकत घ्यायची आणि त्यावरून आपले कुठलेही पाणी पसार केले (?) की झाले त्याचे संस्कारीत पाणी तयार..
असे हे संस्कारीत पाणी सामान्य पाण्यापेक्षा दाहा ते पंधरा मिनिटे लवकर तापते. याची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते. फार पूर्वी ही विशिष्ट झऱ्याचे पाणी वापरून असाध्य रोग बरे झाल्याची उदाहरणे वानगीदाखल आहेतच. आज मात्र या संस्कारीत पाण्याचे स्प्रे सुद्धा मिळतात. कुणाला पाहीजे असतील तर अमुक अमुक क्रमांकावर संपर्क करा.
मंडळी ही कुठली जाहिरात नाही. (नजर रक्षा कवच किंवा महालक्ष्मी टाईप यंत्राची ) हा आहे आपल्या लाडक्या पूरोगामी चित्रलेखातल्या चालू ;) अंकातला मुखपृष्ठ लेख. असू द्या. एवढे अक्षरशः पाण्यासारखे पैसे खर्च करून मानवकल्याणाच्या योजना, आरोग्य सुविधा सरकार करते आहे. त्यापेक्षा पाण्यानेच तेही एका काचेच्या चकतीवरून पसार झालेल्या (की केलेल्या) जर इतके प्रश्न सुटत असतील तर त्याची जाहिरात ही व्हायलाच हवी.
पण या सारांशावरून तुमच्या मनात काही प्रश्नांचे काहूर माजले का? मग त्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. ती या संस्कारीत पाण्याच्या समर्थकांनी द्यायला हवीत. पण या लेखात एक मजेशीर वाक्य आहे.
आम्ही या पाण्याची कुणावरही सक्ती करत नाही. कारण मनोभावे वापरले तरच या पाण्याचा उपयोग होतो. शंकाखोरांच्या पदरी फारसे काही पडत नाही.
म्हणजे हे झाले मारुतीच्या बेंबीतल्या गार वाटणाऱ्या विंचवासारखेच.
हे संस्कारीत पाणी मिळवायचे कुठून? सोपे आहे. पंधरा हजाराच्या आसपास एक काचेची डिस्क (साधीसुधी नाही तर नासा आपल्या अंतराळात जो काच वापरते त्या काचेपासून बनलेली ) विकत घ्यायची आणि त्यावरून आपले कुठलेही पाणी पसार केले (?) की झाले त्याचे संस्कारीत पाणी तयार..
असे हे संस्कारीत पाणी सामान्य पाण्यापेक्षा दाहा ते पंधरा मिनिटे लवकर तापते. याची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते. फार पूर्वी ही विशिष्ट झऱ्याचे पाणी वापरून असाध्य रोग बरे झाल्याची उदाहरणे वानगीदाखल आहेतच. आज मात्र या संस्कारीत पाण्याचे स्प्रे सुद्धा मिळतात. कुणाला पाहीजे असतील तर अमुक अमुक क्रमांकावर संपर्क करा.
मंडळी ही कुठली जाहिरात नाही. (नजर रक्षा कवच किंवा महालक्ष्मी टाईप यंत्राची ) हा आहे आपल्या लाडक्या पूरोगामी चित्रलेखातल्या चालू ;) अंकातला मुखपृष्ठ लेख. असू द्या. एवढे अक्षरशः पाण्यासारखे पैसे खर्च करून मानवकल्याणाच्या योजना, आरोग्य सुविधा सरकार करते आहे. त्यापेक्षा पाण्यानेच तेही एका काचेच्या चकतीवरून पसार झालेल्या (की केलेल्या) जर इतके प्रश्न सुटत असतील तर त्याची जाहिरात ही व्हायलाच हवी.
पण या सारांशावरून तुमच्या मनात काही प्रश्नांचे काहूर माजले का? मग त्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. ती या संस्कारीत पाण्याच्या समर्थकांनी द्यायला हवीत. पण या लेखात एक मजेशीर वाक्य आहे.
आम्ही या पाण्याची कुणावरही सक्ती करत नाही. कारण मनोभावे वापरले तरच या पाण्याचा उपयोग होतो. शंकाखोरांच्या पदरी फारसे काही पडत नाही.
म्हणजे हे झाले मारुतीच्या बेंबीतल्या गार वाटणाऱ्या विंचवासारखेच.