घाव अजुनी...

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

पुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर व्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या संदर्भात....

शाळेत असतांना सुटी असली की आईवडीलांना पत्ता लागू न देता मित्रांसोबत दूर रानात भटकायला जायचो. कधी कधी शाळा चुकवूनही हे उद्योग केल्याचे आठवते. यात एक धाडस वाटायचे. (पण तेव्हा आईवडीलांच्या धाकापूढे ह्या धाडसाची लगेच वाफ व्हाययी.) या भटकण्यात जिज्ञासा शमवणा-य़ा नको त्या (?) उद्योगांपासून उधाणणा-या ओढ्यात पोहायचा प्रयत्न करणे, आंब्याच्या झाडावर जीवघेण्या उंचीपर्यंत जाऊन आंब्याचा उरलासुरला पाड शोधणे... क्वचित बिड्या फुंकणे असले उद्योग करायचो...( या पैकी काही उद्योगांमधली थोडीशी ही चुक आम्हा भावंडांची संख्या एक ने कमी करायला पूरेशी होती... पण तेव्हा ते कुठे कळत होते.) आज त्याचे स्वतःलाच कौतुक वाटते. पण यापोटी पाठ शेकायची वेळ येईपर्यंत मारही खाल्लेला आहे.. तेव्हा फार पाचव्या सहाव्या वर्गात असेन....... आज काळाच्या संदर्भात तेव्हा ते तितकेच गंभीर असावे आणि आजचे तितकेच क्षुल्लक असे वाटते.... बाकी तावातावाने पोराबाळांच्या काळजीतून लिहीणे हा जनरेशन ग्याप म्हणावा का... (तरीही आज तालुक्याच्या गावी असला प्रकार निदान शाळेतल्या मुलांच्या बाबतीत तरी होत नाही हे ही नमुद करायला हवे...)






***