उगाच कसलं काय मिथ्या वगैरे! छ्या..!
जग आहे, जगात सुख आहे आणि दुःखही आहे. दुःखाशी सामना करत करत विधायकतेने जास्तीत जास्त सुखी होउन जगण्याचा प्रयत्न करत जीवन जगणे हे सत्यच. राबराब राबून काडीकाडी चा संसार उभा करून कृतकृत्य होऊ पाहणाऱया माणसाला तुझी सारी मेहनत म्हणजे निव्वळ फुकाचा व्यवहार आहे असे सांगणे म्हणजे जगाला सुखे सगळी मिथ्या म्हणायला लावून आपल्या सुखाची सोय लावण्याचा व जितेपणीच ब्रह्मप्राप्ती करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे.
जगाचा निरास करून मला पहावे, तसा मी नाही, तर सर्वांसकट मीच आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या या सर्वसमावेशक तत्वज्ञानापायीच त्यांना तत्कालिन कर्मठ वर्गाच्या टिकेचे ( कि अत्याचाराचे ) धनी व्हावे लागले. आज आश्चर्यकारकपणे संत ज्ञानेश्वरांचे मोठेपण सगळ्यांना जाणवू लागले आहे. (अरेच्या आपल्याला पिवळा चालत नाही आणि हा तर सगळ्या जगाला चालतो आहे. मग काय करावे बरं... चला हा पिवळा जरी दिसतो तरी तो खऱया अर्थाने लालच कसा आहे हे पटवून देऊ या.) कंसातल्या अशा सुप्त इच्छाशक्ती पायी अवघी ज्ञानतपश्चर्या ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाहून वेगळे नाही. परंतु ज्ञानदेवांनी त्याच दिशेने चिद्विलासवादाकडे जी झेप घेतली तीच ज्ञानेश्वरीची अपूर्वता आहे."अशी ओढाताणीची विधाने करण्यात खर्ची घातली जाते. त्या पेक्षा ज्ञानेश्वरांना जगणे हे व्यर्थ या पाखंडी तत्वज्ञानाचे खंडन करुन जगत् व्यवहारात नवी उर्जा निर्माण केली हे खळखळ न करता मान्य केले तर काय बिघडते हा माझा भाबडा प्रश्न आहे.
जग आहे, जगात सुख आहे आणि दुःखही आहे. दुःखाशी सामना करत करत विधायकतेने जास्तीत जास्त सुखी होउन जगण्याचा प्रयत्न करत जीवन जगणे हे सत्यच. राबराब राबून काडीकाडी चा संसार उभा करून कृतकृत्य होऊ पाहणाऱया माणसाला तुझी सारी मेहनत म्हणजे निव्वळ फुकाचा व्यवहार आहे असे सांगणे म्हणजे जगाला सुखे सगळी मिथ्या म्हणायला लावून आपल्या सुखाची सोय लावण्याचा व जितेपणीच ब्रह्मप्राप्ती करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे.
जगाचा निरास करून मला पहावे, तसा मी नाही, तर सर्वांसकट मीच आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या या सर्वसमावेशक तत्वज्ञानापायीच त्यांना तत्कालिन कर्मठ वर्गाच्या टिकेचे ( कि अत्याचाराचे ) धनी व्हावे लागले. आज आश्चर्यकारकपणे संत ज्ञानेश्वरांचे मोठेपण सगळ्यांना जाणवू लागले आहे. (अरेच्या आपल्याला पिवळा चालत नाही आणि हा तर सगळ्या जगाला चालतो आहे. मग काय करावे बरं... चला हा पिवळा जरी दिसतो तरी तो खऱया अर्थाने लालच कसा आहे हे पटवून देऊ या.) कंसातल्या अशा सुप्त इच्छाशक्ती पायी अवघी ज्ञानतपश्चर्या ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाहून वेगळे नाही. परंतु ज्ञानदेवांनी त्याच दिशेने चिद्विलासवादाकडे जी झेप घेतली तीच ज्ञानेश्वरीची अपूर्वता आहे."अशी ओढाताणीची विधाने करण्यात खर्ची घातली जाते. त्या पेक्षा ज्ञानेश्वरांना जगणे हे व्यर्थ या पाखंडी तत्वज्ञानाचे खंडन करुन जगत् व्यवहारात नवी उर्जा निर्माण केली हे खळखळ न करता मान्य केले तर काय बिघडते हा माझा भाबडा प्रश्न आहे.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा