श्रद्धा अंधश्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
श्रद्धा अंधश्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, २२ एप्रिल, २०१०
वाईट करणाऱ्यांचे खरेच वाईट होते काय?
महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मंदीरातील दानपेटी घोटाळ्याच्या छोट्याश्या झलकीने श्रध्दास्थानांवर फोफावलेल्या लबाडांचे आणखी एक वर्तुळ उघडकीस आले आहे. मंदीरातील अभिषेक बंद करण्यावरुन वाद घालणाऱ्या पुजारी आणि इतर संबंधित मंडळींचे हात दानपेटीतल्या भ्रष्टाचारात देखील प्रत्यक्षअप्रत्यक्षरीत्या गुंतलेले आहेत हे या निमित्ताने स्पष्ट झाले. मंदीरातील मुर्तीला अर्पण केल्या जाणाऱ्या साडीचोळीचा लिलाव होऊन ह्याच साड्या पुन्हा अव्वाच्या सव्वा किमतीला भक्तांच्या माथी मारल्या जातात हे सर्वांना माहित असेलच. पण तुळजाभवानीच्या दानपेटीतील दागिन्यांचा इतक्या पद्धतशीर पणे अपहार करुन गब्बर बननाऱ्यांचे हे कृत्य त्यांच्या अपूर्व धाडसाची प्रचीती देऊन जाते. ( इथे कुणाचे चारआणे किंवा एखादी पेन्सिल चोरली तर देव शिक्षा देईल याचा आम्हाला भयंकर धाक असतो.) तुळजाभवानीच्या गुप्तदानपेटीत भाविक जो पैसा व दागिने टाकतात त्याचा दरमहा लिलाव करण्याची पद्धत आहे. या लिलावात फक्त ठराविक लोकांनाच भाग घेता येईल याची व्यवस्था केली गेलेली आहे. या लिलावाच्या मूळ बोली रक्कमेत व लिलावात भाग घेण्याच्या शुल्कात गेल्या दहा पंधरा वर्षात अवघ्या काही हजारांची वाढ झालेली आहे. आणि या शुल्काचा फक्त काही हिस्सा घेऊन अनेकांना लिलावात भाग घेऊ देण्याचे औदार्य अनेकवेळा दाखवण्यात आलेले आहे. आणि जे काही शुल्क घेतले त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही. गेल्या दहा ते बारा वर्षापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष व धर्मादाय आयुक्तांच्या उपस्थितीत दानपेटी उघडण्याच्या नियमालाही तिलांजली दिली गेली. हे सगळे आपल्या उपस्थितीत व्हायला हवे याची तत्कालीन जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्त यांना माहित नसण्याचीच शक्यता आहे किंवा हेतूपूरस्सर त्यांना त्याकडे दुर्लक्ष केले असणेही शक्य आहे. या सगळ्या लबाड साखळीत अनियमितपणा निर्माण झाल्यामुळे म्हणा की काही अन्य कारणामूळे म्हणा या सर्व प्रकाराबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. धर्मादाय आयुक्तांनी दानपेटीत जमा होणाऱ्या देणगीची सरासरी काढण्याच्या उद्देशाने एक महिन्याच्या अंतराने दानपेटी उघडली तेव्हा त्यात तब्बल बावीस लाख रुपये रोख, त्रेचाळीस तोळे सोन्याचे दागिने व साडेपाचकिलो चांदीच्या वस्तू आढळून आल्या. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षातील लिलावाची माहिती प्रशासनाला देतांना संबंधितांकडे दहा वर्षात सेहेचाळीस ग्राम सोने व अर्धा कीलो चांदी इतकेच दान जमा झाल्याची माहिती दिली होती. एकंदरीत लोकांच्या श्रद्धाभावनेचा (!) गैरफायदा घेऊन लिलावात सहभागी लोकांनी वर्षानुवर्ष स्वतःचे उखळ पांढरे करुन घेतले. लोकांच्या श्रद्धेशी खेळू नका असे म्हणत मूर्तीची झीज होत असल्याचा अहवाल असतांनाही अभिषेकांवरच्या बंदीला विरोध केला. या सर्वात त्यांना भवानीच्या कोपाची भीती कशी वाटली नाही याचा विचार भोळीभाबडी जनता आता करत असेल. पण या लोकांना नक्की माहित असते की आपल्या समोर जो मांडला आहे तो फक्त दगड आणि तो आपले काही वाकडे करु शकत नाही. म्हणून मुजोरपणाने देवादेखत लोकांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचे काम ही मंडळी बिनबोभाटपणे करु शकतात. जनतेचे प्रातिनिधीक स्वरुपातले प्रतिनिधीसुध्दा केले त्याला भरावे लागेल अशी निरर्थक आशावादी विधाने करुन या प्रकारांकडे दुर्लक्ष करतात. पण जर केले त्याला भरावे लागले असते तर हजारो लोकांचे मुडदे पाडण्यात सहभागी असणाऱ्या दाऊद इब्राहीमला अख्खे आयुष्य सुखासमाधानात जगायला मिळाले नसते. कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोठे पुरस्कार मिळून कृतकृत्य होता आले नसते. जो लबाडी करतो त्याच्या विरोधात कायदा माननाऱ्यांनाच उठाव करावा लागणार आहे. करेल तो भरेल या नावाने सुजाण लोक शांत बसून राहीले तर या अपप्रवृत्तींचे दिवसेंदिवस फावणार आहे. कारण यांना पक्के कळून चुकलेले असते की असे काहीच भरावे लागत नाही.
शनिवार, ६ मार्च, २०१०
गहन प्रश्न अर्थात किरकिर
आपण कुणी समाजसुधारक नाही आणि आपली कीरकीर ऐकायला कुणाला वेळही नाही याची पूरेपूर जाणीव असतांना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमूळे आपली स्वतःचीच कीव करावीशी वाटून जाते. की आपला स्वभावच नकारात्मक झाला आहे. पण चला. आपण ही आपली घालमेल लिहून टाकू येथे. जगाचं जे व्हायचं ते होईल निदान आपलं मन तरी थोडंफार हलकं होईल.
कालपरवा स्वामी नित्यानंद महाराजांच्या लिलांचे बऱ्यापैकी मार्केटींग करण्यात इलेक्ट्रॉनिक मिडीयाने यश मिळवले. या महाराजांच्या निषेधापायी पून्हा सामान्य जनताच वेठीस धरली गेली. या जनतेतलीच बरीच डोकी आधी त्यांच्यावरच्या भक्तीपायी वेठीस धरल्या गेली होती. स्वामी नित्यानंद यांचा किंवा अशा मंडळींचा आधी श्रद्धेने ओतप्रोत अशा शब्दप्रयोगांनी उल्लेख करणाऱ्या लोकांनी नंतर जाहीरपणे त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार केला. यात कोण मुर्ख बनते आहे. आणि कोण बनवते आहे. आपण आपल्यावरच हसतो, चिडतो आहोत की आणखी कुणावर हा प्रश्न नेहमीप्रमाणे बाजूलाच राहीला. नित्यानंदासाठी नरेंद्र मोदींनीही हेलिकॉप्टरने हजेरी लावली होती हे नंतर चर्चिल्या गेले. जनतेच्या प्रतिनिधींनी सार्वजनिकरित्या आपल्या तथाकथित श्रद्धेचे प्रदर्शन करणे खरे तर लाजिरवाणे आहे. पण हे सगळे एखाद्या महाराजांचा भंडाफोड झाल्यावरच. तोपर्यंत ती लोकभावनेची एका सुज्ञ व्यक्तीने केलेली कदर असते. बरं हा भंडाफोड ही जनमाणसावर फार काळ परिणाम करु शकत नाही. ज्या सत्यसाईबाबांची पद्मपाद्यपूजा की काय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी केली त्या सत्यसाईबाबांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांवर काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या मासिकांचे स्पेशल एडीशन निघाल्याचे मला आठवते. कालपरवा ज्या कृपाळू महाराजांच्या कृपेने सत्तरावर लोकांना जी सद्गती मिळाली त्या कृपाळूमहाराजांना बलात्काराच्या आरोपांनंतर नागपूरहून हाकलण्यात आले होते हे ही बऱ्याच जणांना आठवत असेल. बरं कृपाळू महाराजांची भक्तमंडळी तर महाराजांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यावर या मृत लोकांना काळाने मारले त्यात महाराजांचा दोष काहीच नाही असे सांगत आहेत. नित्यानंदांच्या युट्यूब मिटक्या मारत पहाणारेही अर्धीमुर्धी क्लीप पाहील्यावर थोडे मनाशी चडफडून महाराजांना शिव्या घालीत आहेत. या शिव्या संस्कृतीच्या अधःपतनाबद्दल कीती आणि संधी का न मम जिवाला या न्यायाने घातल्या जात आहेत हे ही या मंडळींना एकदा विचारायला हवे. आणि मूळात एखाद्याच्या खाजगी आयुष्याची अशी लक्तरे टांगणारेही संस्कृतीनिष्ट किती आणि व्यवसायनिष्ठ किती हा प्रश्न उरतोच. शेवटी माणूस काय नि महाराज काय हा सामान्य विकारांना बांधील असतोच. बाकी तपस्वीपणाच्या आणि आत्मज्ञानाच्या गप्पा माराव्या त्या नित्यानंदक्षमता निकामी झाल्यावरच. अन्यथा सर्व वृथा खेळ. माणसाने माणूसपणाच्या संस्कृतीचा मुलामा कितीही मिरवला तरी तो मुलामाच. माणूस हा शेवटी एक पशूच. तो दिवसरात्रीतल्या काही क्षणापूरता का होईना पशूसारखा जगू इच्छितो. जगो बापडा. पण असं जगतांना त्याने सामान्य माणसाच्या श्रद्धेला का वेठीस धरावे. आणि जी वेठीस धरली जाऊ शकते ती श्रद्धा असते का. मांढरदेवीला जा की हज यात्रेला, कृपाळू महाराजांकडे जा की अजून एखाद्या दैवताकडे. जेव्हा जीवावर बेतते तेव्हा आपणच आपल्याला धावपळ करुन लोकांना, लोकांच्या लहानग्यांना पायाखाली तुडवून वाचवायला हवे. ही दगडी दैवते आपल्या कामाची नाहीत हे जनतेला कळते. शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत, प्रसंगी उन्हातान्हात वृद्धांना लेकरांना पायी चालवत या दगडांपर्यंत पोचतांनाच माणसाची ही समज कुठे जाते हा मोठा गहन प्रश्न आहे......
कालपरवा स्वामी नित्यानंद महाराजांच्या लिलांचे बऱ्यापैकी मार्केटींग करण्यात इलेक्ट्रॉनिक मिडीयाने यश मिळवले. या महाराजांच्या निषेधापायी पून्हा सामान्य जनताच वेठीस धरली गेली. या जनतेतलीच बरीच डोकी आधी त्यांच्यावरच्या भक्तीपायी वेठीस धरल्या गेली होती. स्वामी नित्यानंद यांचा किंवा अशा मंडळींचा आधी श्रद्धेने ओतप्रोत अशा शब्दप्रयोगांनी उल्लेख करणाऱ्या लोकांनी नंतर जाहीरपणे त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार केला. यात कोण मुर्ख बनते आहे. आणि कोण बनवते आहे. आपण आपल्यावरच हसतो, चिडतो आहोत की आणखी कुणावर हा प्रश्न नेहमीप्रमाणे बाजूलाच राहीला. नित्यानंदासाठी नरेंद्र मोदींनीही हेलिकॉप्टरने हजेरी लावली होती हे नंतर चर्चिल्या गेले. जनतेच्या प्रतिनिधींनी सार्वजनिकरित्या आपल्या तथाकथित श्रद्धेचे प्रदर्शन करणे खरे तर लाजिरवाणे आहे. पण हे सगळे एखाद्या महाराजांचा भंडाफोड झाल्यावरच. तोपर्यंत ती लोकभावनेची एका सुज्ञ व्यक्तीने केलेली कदर असते. बरं हा भंडाफोड ही जनमाणसावर फार काळ परिणाम करु शकत नाही. ज्या सत्यसाईबाबांची पद्मपाद्यपूजा की काय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी केली त्या सत्यसाईबाबांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांवर काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या मासिकांचे स्पेशल एडीशन निघाल्याचे मला आठवते. कालपरवा ज्या कृपाळू महाराजांच्या कृपेने सत्तरावर लोकांना जी सद्गती मिळाली त्या कृपाळूमहाराजांना बलात्काराच्या आरोपांनंतर नागपूरहून हाकलण्यात आले होते हे ही बऱ्याच जणांना आठवत असेल. बरं कृपाळू महाराजांची भक्तमंडळी तर महाराजांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यावर या मृत लोकांना काळाने मारले त्यात महाराजांचा दोष काहीच नाही असे सांगत आहेत. नित्यानंदांच्या युट्यूब मिटक्या मारत पहाणारेही अर्धीमुर्धी क्लीप पाहील्यावर थोडे मनाशी चडफडून महाराजांना शिव्या घालीत आहेत. या शिव्या संस्कृतीच्या अधःपतनाबद्दल कीती आणि संधी का न मम जिवाला या न्यायाने घातल्या जात आहेत हे ही या मंडळींना एकदा विचारायला हवे. आणि मूळात एखाद्याच्या खाजगी आयुष्याची अशी लक्तरे टांगणारेही संस्कृतीनिष्ट किती आणि व्यवसायनिष्ठ किती हा प्रश्न उरतोच. शेवटी माणूस काय नि महाराज काय हा सामान्य विकारांना बांधील असतोच. बाकी तपस्वीपणाच्या आणि आत्मज्ञानाच्या गप्पा माराव्या त्या नित्यानंदक्षमता निकामी झाल्यावरच. अन्यथा सर्व वृथा खेळ. माणसाने माणूसपणाच्या संस्कृतीचा मुलामा कितीही मिरवला तरी तो मुलामाच. माणूस हा शेवटी एक पशूच. तो दिवसरात्रीतल्या काही क्षणापूरता का होईना पशूसारखा जगू इच्छितो. जगो बापडा. पण असं जगतांना त्याने सामान्य माणसाच्या श्रद्धेला का वेठीस धरावे. आणि जी वेठीस धरली जाऊ शकते ती श्रद्धा असते का. मांढरदेवीला जा की हज यात्रेला, कृपाळू महाराजांकडे जा की अजून एखाद्या दैवताकडे. जेव्हा जीवावर बेतते तेव्हा आपणच आपल्याला धावपळ करुन लोकांना, लोकांच्या लहानग्यांना पायाखाली तुडवून वाचवायला हवे. ही दगडी दैवते आपल्या कामाची नाहीत हे जनतेला कळते. शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत, प्रसंगी उन्हातान्हात वृद्धांना लेकरांना पायी चालवत या दगडांपर्यंत पोचतांनाच माणसाची ही समज कुठे जाते हा मोठा गहन प्रश्न आहे......
सोमवार, २ नोव्हेंबर, २००९
श्रद्धाळू महाराष्ट्राचे दूर्देव
श्रद्धेबद्दल किंवा अंधश्रद्धेबद्दल मत मांडतांना फार काळजीपूर्वक विधाने करावी लागतात. कारण केलेल्या विधानाला पटवून देण्याची जबाबदारी प्रत्येकवेळी आपल्यावर असते. तशी ती प्रत्येक ठिकाणीच असते. एक संवेदनशील माणुस म्हटला की त्याला जगाच्या वाईटाची चीड असतेच. आणि मानव्याच्या हिताच्या कसोटीवर एखादी गोष्ट उतरते का याचे उत्तर शोधत अशी संवेदनशील माणसे आपली मते बनवित असतात.
मंगळवार, १३ जानेवारी, २००९
पिढ्यानपिढ्या रक्तात भिनलेले देवाचे भूत.
मन उद्विग्न झाले आहे. असणारे काम, मिळणारे वेतन, कामाचे समाधान याबाबत फारशा काही तक्रारी नाहित. परंतु लोकांच्या विचारधारा, जगाच्या जाऊ देत (निदान सध्या तरी) पण जवळच्या माणसांची बंद असलेली विचारांची झापडे अनुभवास आली की जीवाची नुस्ती काहिली होते.

